वि. स. खांडेकर आणि त्यांच्या साहित्याबद्दल मराठीत खूप लिहलं गेलं आहे. मात्र, त्यांच्या चित्रपटसृष्टीतील कामगिरीबद्दलचा इतिहास झाकोळलेलाच राहिला. याचं प्रमुख कारण होतं, त्यांच्या पटकथांची अनुपलब्धता. आज प्रथमच त्यांच्या पटकथांचा संग्रह `अंतरीचा दिवा` मराठी वाचकांच्या हाती येत आहे.
मराठी चित्रपटसृष्टीची मरगळ दूर होत असताना प्रज्वलित होणारा हा साहित्यिक नंदादीप, पुन्हा एकदा ध्येयधुंद चित्रपटांची सांजवात पेटवत मराठी चित्रपटसृष्टीचा कायाकल्प घडवून आणिल !
वि.स खांडेकरांना मराठीचे मॅक्झिम गॉर्की, प्रेमचंद, शरच्चंद्र का म्हटलं जातं, हे समजून घ्यायचं, तर हा अंतरीचा दिवा एकदा का होईना, आपल्या –हदयी मंद तेवत ठेवायलाच हवा..